
Climate Change : हवामान बदल म्हणजे काय? त्याचे माणसावर आणि पृथ्वीवर काय परिणाम होतायत?

माणसाच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि या Climate Change म्हणजेच हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण होत आहेत.
जर याविषयी पावलं उचलली नाहीत तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होईल. भयानक दुष्काळ होतील, समुद्राची पातळी वाढेल आणि पक्षी-प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होतील.
वाढत्या मानवी घडामोडींमुळं कार्बन डाय ऑक्साईड (CO2) उत्सर्जनाचं प्रमाण वाढलं असून, परिणामी तापमानातही वाढ झाली आहे.
हवामान बदल (Climate Change) म्हणजे काय?
एखाद्या ठराविक ठिकाणी अनेक वर्षांपासून असलेली ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची स्थिती म्हणजे हवामान. या सरासरी हवामानातला बदल म्हणजेच क्लायमेट चेंज - हवामान बदल.
माणसाद्वारे घरी, फॅक्टरी आणि वाहतुकीसाठी केला जाणाऱ्या तेल, गॅस आणि कोळशाच्या वापरामुळे हवामानत झपाट्याने बदल होत आहेत.
जैवइंधन ज्यावेळी जाळलं जातं, त्यावेळी त्यातून ग्रीन हाऊस गॅसेसचं उत्सर्जन होतं. यात कार्बन डाय ऑक्साईड (CO2)चं प्रमाण जास्त आहे. या वायूंमुळे सूर्याकडून आलेली उष्णता अडकून राहते आणि त्यामुळे पृथ्वीवरचं तापमान वाढतं.

फोटो स्रोत, AFP
हवामान बदलांमुळे निसर्ग चक्रात टोकाचे बदल होतील
19व्या शतकाच्या तुलने आता जगभरातलं तापमान 1.2 सेल्सिअसने वाढलेलं आहे. तर वातावरणातल्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 50 टक्क्यांनी वाढलंय.
हवामान बदलाचे विपरित परिणाम होणं टाळायचं असेल तर जगाचं तापमान वाढण्यापासून रोखणं गरजेचं असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलंय. 2100 पर्यंत ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण 1.5 सेल्शियसपर्यंत रोखणं गरजेचं आहे.
पण जर वेळीच पावलं उचलली नाहीत तर या शतकाच्या अखेरपर्यंत पृथ्वीचं तापमान 2 अंशांनी वाढण्याची भीती आहे.
काहीही केलं नाही तर पृथ्वीचं तापमान 4 सेल्सियसने वाढेल आणि परिणामी विनाशकारी उष्णतेची लाट येईल, समुद्राची पातळी वाढल्याने लाखो लोकांची घरं जातील आणि पृथ्वी ग्रहाचं आणि यावरच्या जैवसृष्टीचं भरून न येणारं नुकसान होईल.
हवामान बदलाचे परिणाम काय?
हवामानात होणाऱ्या टोकाच्या बदलांचे परिणाम पहायला मिळत आहेत. यामुळे अनेक आयुष्य आणि रोजीरोटी धोक्यात आलेली आहे.
- COP27 ही हवामान बदलाची परिषद काय आहे? जगाचं याकडे का लक्ष आहे?
- जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल म्हणजे काय? त्याची चिंता का करावी?
- अंटार्क्टिकाचं बर्फ कमी का होतंय? जाणून घ्या 4 महत्त्वाचे मुद्दे
- हवामान बदलामुळे बुडत असेल्या मालदिवमध्ये सुरू आहे नव्या शहराची निर्मिती
हवामान बदलामुळं आपली (मानवाची) जीवनशैली बदलू शकते. सुपीक जमिनीचं रेताड जमिनीत रूपांतर होईल. पाण्याच्या कमतरतेुमळं पिकं, अन्न उगवणं देखील कठीण होईल.
समुद्राच्या पातळीत होत असलेल्या वाढीमुळं काही भागांत प्रचंड उष्णता वाढेल, आणि ते ठिकाण निवास करण्यास योग्य राहणार नाहीत. चीन, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्समध्ये आलेल्या पुरामध्ये हे पहायला मिळालं.
हवामानात टोकाचे बदल जाणवतील. उष्णतेची लाट, मुसळधार पाऊस, वादळं हे सर्व वारंवार होईल, त्याचं प्रमाणही वाढत जाऊन मानवी जीवनासाठी ते धोकादायक ठरेल.
गरीब देशांतील लोक ज्यांना याच्याशी जुळून घेणं सर्वाधिक कठीण ठरेल त्यांना सर्वाधिक त्रास होईल.
वातावरणावर हवामान बदलाचे परिणाम
ध्रुवावरील बर्फ आणि हिमनद्या वेगानं वितळत आहेत. त्यामुळं समुद्राची पातळी वाढत असलेल्या सखल किनारी भागांमध्ये पुराचा धोका वाढला आहे.
सायबेरिया सारख्या ठिकाणी पर्माफ्रॉस्टसारखी ठिकाणं वितळतील. आपल्या वातावरणात सोडला जाणारा मिथेन हा आणखी एक हरितगृह वायूदेखील हवामान बदलाची तीव्रता अधिक वाढवत आहे.

ग्रीनलंडमधली वितळणारी बर्फाची चादर
जंगलात आगी लागण्याच्या, वणवे पेटण्याच्या घटनांसाठी अनुकुल असं हवामान अधिक प्रमाणात तयार होईल.
निसर्गावरचे हवामान बदलाचे परिणाम
निवासस्थानं बदलत असल्यानं काही प्रजाती या नव्या ठिकाणी स्थलांतरीत होतील.
- उष्णतेच्या लाटेत युरोप होरपळतोय, काय आहेत कारणं?
- युरोपात उष्णतेची लाट, पारा ४० अंशांवर गेल्याने पॅरीसमध्ये शाळांना सुटी
- टळटळीत उन्हात शरीराची काळजी घेण्याचे 'हे' आहेत 7 मार्ग
मात्र हवामान बदल एवढ्या झपाट्यानं होत आहे, की त्यापैकी अनेक नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
ध्रुवीय अस्वलं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कारण ते अवलंबून असलेल बर्फच वितळू लागला आहे.
अटलांटिक साल्मन नदीच्या पाण्यात नष्ट होऊ शकतात. नदीच्या पाण्याचं तापमान वाढल्यानं त्यांच्यावर परिणाम होईल.
समुद्र अधिक प्रमाणात कार्बव डायऑक्साईड शोषत असून त्यामुळं पाण्यात अॅसिडचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळं Tropical coral reefs सारखे सागरी जीव नष्ट होतील.
गेल्या काही काळापासून तुमच्या वाचनामध्ये COP27 हे नाव आलं असेल. COP27 हे एका परिषदेचं नाव असून ही परिषद इजिप्तमध्ये 6 ते 18 नोव्हेंबरमध्ये होणार आहे. ही संयुक्त राष्ट्राची पर्यावरण परिषद आहे.
जगभरातील विविध देशांचे नेते या परिषदेत एकत्र येऊन हवामान बदल आणि तापमान वाढीवर चर्चा करणार असून सध्या जगासमोर असलेल्या प्रश्नांवर उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करतील.
2022 United Nations Climate Change Conference असे या परिषदेचे पूर्ण नाव आहे. तर COP चा अर्थ 'कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज' (सहभागी देशांची परिषद) असा आहे.
हवामान बदलाची कारणं काय?
हवामानात नैसर्गिक बदल हे पूर्वीपासून होत आलेले आहेत.
मात्र आता, विविध मानवी घडामोडींमुळं जागतिक तापमानात वाढ होत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
वीज प्रकल्प, वाहतूक आणि घरांमध्ये उष्णता वाढवण्यासाठी आपण इंधन, गॅस आणि कोळसा वापरायला सुरुवात केली, तेव्हापासून आतापर्यंत जगात 1.2 सेल्सिअस एवढं तापमान वाढलं आहे.
त्याशिवाय या इंधनांच्या वापरामुळं हवेत सोडले जाणारे वायू हे, सूर्याची ऊर्जा अडवतात.
19 व्या शतकापासून आतापर्यंत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड (CO2) या एकट्या हरितगृह वायूचं प्रमाण 50 टक्क्यांनी वाढलं आहे. तर गेल्या 20 वर्षात त्यात 12 टक्के वाढ झाली आहे.
हरितगृह वायुंचं प्रमाण वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे जंगलतोड.

समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढत राहिलं तर कोरल रीफ म्हणजे प्रवाळांचा पट्टा नष्ट होईल.
झाडं जेव्हा जाळली किंवा तोडली जातात, तेव्हा ते साठवलेला कार्बन वातावरणात सोडत असतात.
भविष्यात काय होणार?
शास्त्रज्ञांनी हवामान बदलासाठी 1.5 सेल्सिअसपर्यंत तापमान वाढ ही मर्यादा ठरवली आहे. एवढी वाढ सुरक्षित असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
जर तापमान अधिक वाढत गेलं, तर नैसर्गिक वातावरणाला पोहोचणाऱ्या हानीमुळं मानवी जीवनशैलीवरही परिणाम होऊ शकतो.
अनेक शास्त्रज्ञांच्या मते, असं घडू शकतं. शतकाच्या अखेरीपर्यंत वातावरणातील तापमानाची वाढ 3 अंशापर्यंत असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जगभरात हवामान बदलाचे काय परिणाम होतील?
- प्रचंड पावसाच्या परिस्थितीमुळे इंग्लंडमध्ये पूरपरिस्थिती आवाक्याबाहेर जाईल.
- पॅसिफिक क्षेत्रातील सखल भागात असलेले बेटांवरील काही देश पाण्याखाली किंवा समुद्राखाली जाऊ शकतात.
- आफ्रिकेतील बहुतांश देशांमध्ये दुष्काळ आणि अन्नाच्या तुटवड्याची समस्या निर्माण होऊ शकते.
- उत्तर अमेरिकेतही दुष्काळाची गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. तशीच स्थिती पश्चिम अमेरिकेतही असेल. तर इतर भागांत पावसाचं प्रमाण वाढेल आणि वादळांचं प्रमाण वाढेल.
- ऑस्ट्रेलियात तीव्र दुष्काळ आणि प्रचंड उष्णता अशा समस्या उद्भवतील.
जगभरातली सरकारं काय करत आहे?
हवामान बदलाचं आव्हान सगळ्यांनी एकत्र येऊन हाताळता येईल, यावर जगभरातल्या देशांचं एकमत झालेलं आहे. पॅरिसमध्ये 2015 झालेल्या महत्त्वाच्या कराराद्वारे ग्लोबल वॉर्मिंग 1.5 सेल्शियसपर्यंत रोखण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं.

नोव्हेंबर 2021 मध्ये युकेमध्ये जगभरातल्या देशाच्यां नेत्यांची ग्लासगो क्लायमेट कॉन्फरन्स होत असून यामध्ये जगभरातले देश 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी कसं करायचं यासाठीची आखणी करतील.
या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे 2050 पर्यंत हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचं प्रमाण कमी करून ते शून्यावर आणण्याचं विविध देशांना लक्ष्य ठेवलं आहे.
म्हणजे कोणत्याही प्रकारच्या वायू उत्सर्जनाच्या प्रमाणात ते वायू शोषले जातील असं समतोल राखला जाईल, अशा उपाययोजना केल्या जातील. उदाहरण द्यायचं झाल्यास, झाडं लावून हे प्रमाण कमी केलं जाईल.
या माध्यमातून तापमानात झपाट्यानं होणारी वाढ थांबवून, हवामान बदलाचे गंभीर दुष्परिणाम टाळता येऊ शकतील.
शास्त्रज्ञ काय करत आहेत?
हवामान बदलाबाबतचा शास्त्रज्ञांचा अभ्यास वाढला असून त्यात आणखी वाढ होत आहे.
उदाहरण द्यायचं झाल्यास, ते आता हवामान बदल आणि प्रचंड पाऊस किंवा उष्णतेची लाट यांसारख्या स्वतंत्र घटनांचाही संबंध जोडू शकतात.
भविष्यात अशा घटनांचा अंदाज त्यांना आधीच लावणं हे, अधिक चांगल्या प्रकारे शक्य होईल अशी अपेक्षा आहे.
हवामान बदलांबद्दल तुम्ही - आम्ही काय करू शकतो?
शास्त्रज्ञांच्या मते सामान्य लोक खालील गोष्टी करू शकतात :
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किंवा सायकलचा वापर वाढवून वाहनांचा वापर कमी करावा.
- घरं इन्सुलेट (उष्णतेपासून बचावासाठी विशिष्ट गोष्टीचा थर देणे) करा
- विमानांचा वापर कमीत कमी करा
- मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचं सेवन कमी करा.
युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजची 27 वी बैठक यावर्षी 7 ते 18 नोव्हेंबर या काळात होण्याची शक्यता आहे. इजिप्तमधील शर्म-अल शेख येथे ही बैठक होईल.
वास्तविक ही बैठक 2021 मध्ये होणार होती मात्र कोरोना साथीमुळे ती आता 2022मध्ये होत आहे.
हेही वाचलंत का?
- 2021मध्ये तरी पर्यावरणाच्या समस्या सोडवल्या जातील का?
- हवामान बदल : IPCCचा हवामान इशारा भारताच्या दृष्टीनं धोक्याची घंटा?
- पृथ्वीसाठी धोक्याची घंटा, तापमान दोन अंशांनी वाढणार
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube , Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

मोठ्या बातम्या
ग्रीन फटाके काय असतात, ते किती परिणामकारक असतात, उत्तरकाशी : बोगद्यात अडकलेल्या 40 जणांना वाचवण्यासाठी मदतकार्य वेगाने सुरू, चंदेरी साडीची 700 वर्षं जुनी पंरपरा मराठा साम्राज्यामुळे अशी टिकून आहे, बीबीसी मराठी स्पेशल.

पॅलेस्टाईन स्वतंत्र देश का बनू शकला नाही? 'ही' आहेत कारणं

वसईचा किल्ला : इथे पोर्तुगीजांनी वसवलेलं युरोपियन शहर, चिमाजी अप्पांनी त्यांना कसं हरवलं?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारताना दिल्या होत्या 'या' 22 प्रतिज्ञा

लंडनहून आणली जाणारी वाघनखं शिवाजी महाराजांची? ती इंग्लंडला कोणी आणि कशी नेली?

भारतीयांना नग्न फोटोंच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणाऱ्या जीवघेण्या स्कॅमचा बीबीसीकडून पर्दाफाश
सर्वाधिक वाचलेले.
- 1 चंदेरी साडीची 700 वर्षं जुनी पंरपरा मराठा साम्राज्यामुळे अशी टिकून आहे
- 2 रशियाने पाकिस्तानला विकलेली हेलिकॉप्टर्सची इंजिन्स परत मागितली कारण
- 3 डायबिटीस : ही आहेत 7 लक्षणं, हा आजार टाळण्यासाठी काय करावं? वाचा
- 4 'मी 37 वर्षांचा होईपर्यंत कधीही सेक्स केला नव्हता' शेवटचा अपडेट: 14 जानेवारी 2021
- 5 इस्रायलमध्ये मृतदेह शोधण्यासाठी शिकारी पक्ष्यांचा वापर
- 6 शेवटची ओव्हर, 6 बॉल 6 विकेट घेत गॅरेथ मॉर्गननं रचला इतिहास
- 7 महाराष्ट्राच्या इतिहासातील 'साडेतीन शहाणे' कोण होते? शेवटचा अपडेट: 15 फेब्रुवारी 2022
- 8 उत्तरकाशी : बोगद्यात अडकलेल्या 40 जणांना वाचवण्यासाठी मदतकार्य वेगाने सुरू
- 9 पहिल्यांदा सेक्स करण्यासाठी योग्य वय आणि वेळ कोणती? शेवटचा अपडेट: 5 फेब्रुवारी 2022
- 10 सुवर्णदुर्गः कान्होजी आंग्रेंनी अरबी समुद्रातल्या या किल्ल्यामुळे रोवले पाय
- Photogallery
- Gadgets News
- Science Technology
- Climate Change And Rising Temperature
हवामानबदल आणि तापमानवाढ
अलीकडील काही वर्षांपासून स्थिर हवामानात वायूप्रदूषण, जंगलतोड आणि मानवनिर्मित पर्यावरणामुळे बदल होऊ लागला असून पृथ्वीचे आणि शहरांचे तापमान वाढले आहे आणि त्याचे मोठे धोके आहेत....

>> प्रा. सुरेश चोपणे गेल्या अनेक वर्षांपासून आपण वाढते तापमान अनुभवत आलो आहोत. अतिपाऊस, वादळे, उष्णलहर, शीतलहर आता हा नित्याचाच भाग झाला आहे. पृथ्वीला वातावरण असल्यामुळेच हवामान आणि तापमान आहे. जमीन, समुद्र, सूर्य आणि हवा या सर्व नैसर्गिक घटकांपासून हवामान तयार होते. दररोजच्या बदलत्या परिस्थितीला अस्थिर हवामान (वेदर) तर वार्षिक स्थिर हवामानाला (क्लायमेट) म्हणतात. परंतु, अलीकडील काही वर्षांपासून स्थिर हवामानात वायूप्रदूषण, जंगलतोड आणि मानवनिर्मित पर्यावरणामुळे बदल होऊ लागला असून पृथ्वीचे आणि शहरांचे तापमान वाढले आहे आणि त्याचे मोठे धोके आहेत. 'आंतरराष्ट्रीय हवामान बदल संस्था', नासाची 'नोआ' आणि नासाची 'गोडार्ट इन्स्टिट्युट ऑफ स्पेस सायन्स' या संस्थांनी, मागील शतकाची पृथ्वीच्या हवामानाची आकडेवारी तपासली असता पृथ्वीच्या सरासरी तापमानात, १९५१-१९८०च्या तुलनेत, १८८०-२०१७ पर्यंत तापमानात खूप वाढ (०.३-१.७ अंश सेल्सिअस)झाल्याचे म्हटले आहे. यामुळे ओझोन थर विरळ होणे, बर्फ वितळणे, समुद्रपातळी वाढणे, त्याचे अल्कली-आम्लीकरण होणे, उष्ण हवामान होणे, जैवप्रजाती नष्ट होणे, अन्नसुरक्षेचा धोका आणि आरोग्याचे मोठे धोके निर्माण होणार असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे . अलीकडील तापमानाचे उच्चांक पाहिल्यास आपण शहरांचे आणि पृथ्वीचे वाळवंट केल्याचे लक्षात येईल. देशातील सर्वाधिक तापमान फालोडी-राजस्थान येथे १९ मे २०१६ ला ५१ अंश सेल्सिअस मोजले गेले. चंद्रपूरला २ जून २००७ रोजी ४९ अंश, तर नागपूरला १९ मे २०१५ रोजी ४८ अंश सेल्सिअस मोजले गेले. महाराष्ट्रातील मालेगाव, भिरा, बुलढाणा, अकोला, जळगाव, वर्धा, ब्रम्हपुरी, या शहरांत गेल्या २० वर्षांपासून ४४ ते ४६ डिग्री सेल्सिअस तापमान राहिले आहे. आधीची मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर ही तुलनेने थंड शहरेही आता उष्ण झाली आहेत. खऱ्या अर्थाने १९८६ नंतर तापमानवाढीस सुरुवात झाली असून, तीव्र हवामानबदल २००१पासून सुरू झाले. विशेष म्हणजे, २०१०-२०१७ हे सर्वाधिक थंड वर्ष पण ठरलेले आहे. आपली शहरे आता 'उष्ण बेटे' बनली आहेत. भारतीय हवामान विभागाने गेल्या १०० वर्षांच्या हवामानबदलाचा अभ्यास केला. त्यानुसार, १९०१ ते १९३०, १९६१-१९९० आणि १२९१ ते २०२० हा कोरडा आणि जास्त तापमानाचा काल ठरविला आहे. हवामानबदलाचा मुख्य परिणाम तापमानवाढीवर झाला. त्याला प्रदूषण,जंगलतोड,मानवनिर्मित पर्यावरण ही प्रमुख कारणे आहेत. एकीकडे वादळे, हिमवादळे, महापूर, अतिपाऊस, ढगफुटी, तर दुसरीकडे दुष्काळ, शहरे उष्ण द्वीप बनली. समुद्राचे तापमान कमी-जास्त होत असल्याने 'अल नीना' आणि 'ला नीना' प्रभाव दिसत आहे. या सर्व हवामानबदलामुळे शेती,उद्योगांचेही अपरिमित नुकसान होत असून, त्याचा थेट परिणाम देशाच्या उत्पादनावर झाला आहे. जनआरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. हवामानबदल आणि तापमानवाढीमुळे नैसर्गिक आपत्तीत इतकी वाढ झाली की, गेल्या १७ वर्षांत भारताने तीनशे नैसर्गिक आपत्तींना तोंड दिलेले आहे आणि मृत्यूसंख्या ७५ हजारांवर गेली आहे, तर देशाचे ४ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. हे पाहता आपली निसर्गाच्या दूर जाणारी जीवनपद्धती बदलून 'इको फ्रेंडली' करावी लागेल. कारण, आता आपला विकास हाच विनाशाला कारणीभूत ठरू लागला आहे. (विज्ञान व पर्यावरण अभ्यासक )

Climate Change Essay in Marathi
हवामान बदल निबंध मराठी, climate change essay in marathi.
हवामान बदल निबंध मराठी, climate change essay in Marathi: नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हवामान बदल निबंध मराठी, climate change essay in Marathi हा लेख. या हवामान बदल निबंध मराठी लेखात या विषयाची संपूर्ण माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल. सर्व वर्गांतील विद्यार्थी मित्र मैत्रिणींना एकाच लेखात संपूर्ण माहिती देणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे, जेणेकरून तुमचा सर्व वेळ वाया जाणार …
प्रसिध्द मराठी
नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..
- _Multi DropDown
- __DropDown 1
- __DropDown 2
- __DropDown 3
- Privacy Policy
Monday, 2 October 2017
हवामान बदल वर निबंध.
पृथ्वीवरील वातावरणाच्या वातावरणात होणा-या बदलांना हवामानातील बदल म्हणतात. हवामानात वारंवार बदल होत असले तरी, हवामान बदल केवळ तेव्हाच होतो जेव्हा हे बदल दशकांपासून गेले. वातावरणात बदल घडवून आणणारे अनेक घटक आहेत. हे घटक येथे तपशील येथे चर्चा आहेत: हवामानातील बदलाचे विविध कारण विविध बाह्य आणि अंतर्गत प्रणालीतील बदलांमुळे वातावरणातील बदल होतो. आम्हाला याबद्दल तपशीलवार माहिती द्या: आउट-द-बॉक्स ज्वालामुखीचा उद्रेक ज्वालामुखीतील उद्रेक करून त्यांना पृथ्वीचे हवामान प्रभावित करण्यासाठी ओळखले जाते, जे बीओस्फिअरच्या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये 100,000 टन SO2 पेक्षा जास्त उत्पादन करतात. या स्फोटांनी प्रसारणाचा प्रसार कमी केला आहे कारण या वायूमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर सौर विकिरण प्रसारित होते. सौर उर्जा निर्मिती कोणत्या स्थितीत पृथ्वीला सूर्यापासून ऊर्जा मिळते आणि ज्या वातावरणात ही ऊर्जेची उत्सर्जित होते, त्यावरून पृथ्वीवरील हवामान संतुलन आणि तपमान निर्धारित होते. सौर ऊर्जाच्या उत्पादनात होणारा कोणताही बदल जागतिक हवामानास प्रभावित करतो. प्लेट टेक्टोनिक्स टेक्टॉनिक प्लेट्सची गती लाखो वर्षांमधील जमिनी आणि महासागरांच्या पुनर्रचना करून नवीन भौगोलिक रचनेची रचना करते. ही क्रिया जागतिक स्तरावर हवामानाच्या परिस्थितीस प्रभावित करते. पृथ्वीच्या कक्षेत बदल पृथ्वीच्या कक्षेत झालेला बदल सूर्यप्रकाशाचा हंगामी वितरण बदलतो, ज्यामुळे पृष्ठभागावर पोहोचण्यासाठी सूर्यप्रकाश मोजला जातो. तीन प्रकारचे कक्षीय बदल होतात, ज्यामध्ये पृथ्वीच्या पॅथोजेनेसिजमधील बदलांसह, पृथ्वीच्या रोटेशनच्या अक्षाच्या झुकण्याच्या कोनामध्ये बदल होतो, आणि पृथ्वीवरील अक्षांची विकिरण इत्यादी असतात. यामुळे Milankovich chakras निर्माण आहेत जे हवामानावरील मोठा परिणाम करतात. मानवी उपक्रम जीवाश्म इंधन, वाहनांचे प्रदूषण, जंगलतोड, पशु शेती आणि जमिनीचा वापर इत्यादिमुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. हवामानात बदल घडवून आणणारे काही मानवी उपक्रम आहेत. अंतर्गत सैन्याच्या यंत्रणेचा प्रभाव जीवन कार्बन उत्सर्जन आणि जलविभातील नकारात्मक बदलांना चालनामध्ये जीवन महत्त्वाची भूमिका बजावते. हे देखील हवामानातील बदल प्रभावित करते इतर अनेक नकारात्मक प्रभाव प्रदान करण्याव्यतिरिक्त, ते ढगांची निर्मिती, बाष्पीभवन आणि हवामानाच्या स्थितीवर देखील प्रभाव टाकते. समुद्र-वातावरणीय परिवर्तनशीलता वातावरणास आणि महासागर एकत्र आणी अंतर्गत हवामानात बदल घडतात. हे बदल काही वर्षांसाठी टिकू शकतात आणि विपरित जागतिक पृष्ठभागाचे तापमान प्रभावित करू शकतात. हवामानातील बदलांचा प्रभाव हवामानातील बदलामुळे, पृथ्वीवरील पर्यावरणावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. या प्रभावांविषयी तपशील येथे दिले आहेत: जंगलांवर परिणाम वातावरणात कार्बन डाय ऑक्साईडचा समतोल राखण्यात वन महत्वाची भूमिका बजावतो कारण ते कार्बन डायॉक्साईड शोषून घेतात. तथापि, पर्यावरणाच्या बदलत्या वातावरणास सामोरे जाण्यास असमर्थ असलेल्या वृक्षांची अनेक प्रजाती मृत झाल्या आहेत. झाडे वस्तुमान विलोपन कमी जैव विविधतेचे पातळी वातावरणास वाईट लक्षण आहे आली. ध्रुवीय प्रदेशांवर प्रभाव आपल्या ग्रहांचे उत्तर व दक्षिण ध्रुव त्याचे हवामानाचे नियमन करण्यासाठी महत्वाचे आहे आणि त्यानुसार हवामान बदलण्याच्या वाईट प्रभावांवर देखील कार्य केले जात आहे. जर हे बदल तशाच प्रकारे सुरू राहिल्या तर असे अनुमान येत आहे की येत्या वेळेस ध्रुवीय प्रदेशांतील जीवन पूर्णपणे नष्ट होऊ शकते. पाण्यावर परिणाम हवामान बदलामुळे जगभरात पाणी सिस्टिमसाठी काही गंभीर स्थिती निर्माण झाल्या आहेत. या कारण पृथ्वी विविध भागांमध्ये पूर किंवा दुष्काळ परिस्थिती हवामान बदलत आणि लागत पाऊस स्वरूपात जगात बदल झालेले नाहीत. तापमानात वाढ झाल्यामुळे हिमनद्याचे वितळण्याचा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. वन्य जीवनावर प्रभाव वाघ, आफ्रिकन हत्ती, आशियाई गेंडे, Adli पेंग्विन आणि या प्रजाती सर्वात नामशेष ध्रुवीय अस्वल विविध वन्य प्राणी संख्या घट गेला च्या कडा वर आहेत ते बदलून हंगाम सह झुंजणे करण्यात अक्षम आहोत कारण तेथे आहेत निष्कर्ष हवामानातील बदलांमुळे पर्यावरणावर नकारात्मक प्रभाव पडतो. संशोधकांच्या मते, गेल्या काही दशकांत, या बदलाला गती देण्यासाठी मानवी क्रियाकलापांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हवामान बदल नियंत्रित करण्यासाठी आणि पृथ्वीवरील निरोगी वातावरण राखण्यासाठी, पृथ्वीवरील मानवी क्रियाकलापांच्या प्रभावांवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे.
No comments:
Post a comment.

- मराठी विरुद्धार्थी शब्द - मराठी समानार्थी शब्द मराठी समानार्थी शब्द अनाथ = पोरका अनर्थ = संकट अपघात = दुर्घटना अपेक्षाभंग = हिरमोड अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम अभिनंदन = गौरव अभिमा...

- अपारंपरिक उर्जा स्रोत आजही, ऊर्जेचे परंपरागत स्त्रोत महत्वाचे आहेत, या गोष्टी नाकारल्या जाऊ शकत नाहीत, तथापि ऊर्जेच्या अपरंपरागत स्त्रोतांकडे किंवा पर्यायी स्रोता...
Blog Archive

Contact Form

IMAGES
VIDEO
COMMENTS
An essay’s general statement is a broad introduction to the paper’s topic. For example, a persuasive essay aimed at convincing the reader to take action against global warming might begin with a brief description of what climate change mean...
Climate change is one of the most pressing issues of our time. It is a complex and multifaceted issue, and it is important to stay informed about the latest developments. To help you stay up to date, we’ve compiled a list of the top 10 best...
Climate change is one of the most pressing issues of our time, and it’s important to understand the solutions available to us in order to make a difference. One of the most effective ways to reduce climate change is by reducing carbon emiss...
Climate change essay in Marathi - हवामान बदल मराठी निबंध. हवामान बदल या विषयावर लिहलेला हा माहिती निबंध लेख सर्व
माणसाच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि या Climate Change म्हणजेच हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके
Climate Change in Marathi/ हवामान बदल परिचय, कारणे, परिणाम आणि प्रयत्न, MPSC Environment Notes PDF. By BYJU'S Exam Prep.
नोट्स संपादन. ^ America's Climate Choices: Panel on Advancing the Science of Climate Change; National Research Council (2010)
... Marathi News · editorial · samwad; Climate Change And Its Impact On India. हवामान बदलाच्या भारताला झळा. वाढत्या
0. Maharashtra Times - Marathi News. अॅप शहर. फेस्टिवल ... Climate Change And Rising Temperature. हवामानबदल आणि
Climate Change Essay in Marathi 100 Words. 286 views · 1 year ago ...more. The Marathi Knowledge. 1.95K. Subscribe. 1.95K subscribers.
हवामान बदल निबंध मराठी, climate change essay in Marathi: नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हवामान
जागतिक तापमानवाढ - मराठी निबंध | Global Warming Essay in Marathi | Jagatik Tapmanvadh Nibandh. Daily Marathi
"ग्लोबल वॉर्मिंग:चिंता आणि चिंतन"जबरदस्त भाषण निबंध/global warming essay in Marathi. 7K views · 2 years ago ...more
पृथ्वीवरील वातावरणाच्या वातावरणात होणा-या बदलांना हवामानातील बदल म्हणतात. हवामानात वारंवार बदल होत असले तरी